काहीही
करा
. भय
इथले
संपत
नाही
. माणूस
भया
भया
जगतो
. आयुष्याचा
प्रत्येक
क्षण
जणू
रक्षण
मागतो
. सॉमरसेट
मॉम
म्हणतो
``माणसाचे
आयुष्य
तर
वीतभर
आहे
. निसर्ग
तर
ठार
विरोधात
. मग
माणूस
म्हणजे
एक
हास्यास्पद
बाहुले
". भय
, चिंता
, हताशपण
, धास्ती
या
सर्वांचे
प्रतीक
म्हणजे
माणसाला
दिसणारा
अंधार
. माणूस
म्हणतो
"माझ्या
डोळ्या
समोर
तर
सारा
अंधारच
आहे
." आशा
म्हणजे
प्रकाशाची
तिरीप
. हताशा
म्हणजे
तिमिर
. निबिड
अंधार
. पहाटे
भूपाळी
फुटते
. काळोख
दाटला
की
पिशाच्चे
वावरू
लागतात
. आगी
लावायला
अंधार
आधार
पुरवतो
. तम
सरू
दे
. उजेड
पसरु
दे
. कारण
इथे
`अल्प
द्युति
,तम
बहु
` असा
प्रकार
आहे
. अशी
ही
अंधाराची
अरिष्टाशी
आणि
प्रकाशाची
उल्हासाशी
कायम
गाठ
बसली
आहे
. हे
अगदी
जगभरचे
चित्र
आहे
. वेदातच
उषा
सूक्ते
आहेत
असे
नाही
. जगभरचे
धर्मग्रंथ
आणि
माणसांची
नाचगाणी
उजेडाचा
उदोउदो
करतात
. देवालयात
समया
तेवतात
. चर्च
मध्ये
मेणबत्त्या
उजेड
करतात
. मशिदीत
काय
अल्ला
अंधारात
बुडतो
? मशाली
पेटल्या
की
पोवाडे
डफ
वाजवू
लागतात
. देव
हा
शब्दही
दिवा
घेऊन
येतो
. दिव
म्हणजे
प्रकाश
देणे
. दिवा
दाखवतो
त्यालाच
देव
म्हणायचे
. असा
देव
नावाचा
दिवाच
बाल
मुखातून
बोलायला
लागला
, उंच
पिकातून
डोलायला
लागला
की
अंतरी
रामेश्वर
आणि
काशीक्षेत्र
प्रकट
होते
. जगायला
आधार
देत
राहते
. येशू
म्हणतो
``भिवू
नको
.मी
तुझ्या
पाठीशी
आहे
". ``मी
तुला
पापमुक्त
करीन
.शोक
करू
नकोस
.``असे
म्हणत
श्रीकृष्ण
अर्जुनाला
अंधारप्रवृत्तीवर
नेमका
बाण
धरायला
सांगतात
.
मला
चित्तात
धर
आणि
युद्ध
कर
हे
जगभरच्या
मानवाना
देवाचे
सांगणे
आहे
अरिष्टाशी
झुंज
करण्यासाठी
, अंधाराला
दूर
करण्यासाठी
सर्वत्र
माणसे
देवाला
शरण
जातात
. म्हणजे
ती
काही
देवाचे
गुलाम
ठरत
नाहीत
. देवाचे
बोट
धरून
जावे
म्हणतात
. "जेथे
जातो
तेथे
तू
माझा
सांगाती
--चालविशी
हाती
धरुनीया
". माणसाला
आयुष्यभर
आई
लागते
. बाप
पाठीशी
उभा
लागतो
. देव
ही
माणसाची
गरज
आहे
. म्हणूनच
प्रा
. शिवाजीराव
भोसले
सांगायचे
"जगात
देव
नसेलही
पण
तो
माणसाला
हवा
असतो
". केशवसुत
अर्ध
सत्य
सांगून
गेले
. `देव
दानवा
नरे
निर्मिले
` हे
पुरते
खरे
नाही
. देवाला
माणसाने
शोधले
. कारण
दानव
त्याच्या
हरघडी
मानगुटीवर
बसतात
. देव
हा
साक्षात्कार
आहे
. दानव
हा
नेहमीचा
अनुभव
आहे
. देव
मनात
उभा
करायचा
आणि
अंधाराशी
लढायचे
ही
जगभरच्या
मानवाची
जगण्याची
रीत
आहे
.
तुमचा
वेदांत
राहू
दे
बाजूला
. आमचा
आकांत
कसा
शांत
करायचा
ते
सांगा
. पीक
हवे
-भीक
नको
. दवा
द्या
-दुवा
घ्या
. रोग
राई
नको
. धरणी
दुभंगायला
नको
. ढगफूटीमधून
मुलांसकट
वाहून
जायला
नको
. वीज
मस्तकी
पडूदे
नको
. वारे
घोंगावत
येणे
नको
. पाण्याकरिता
ल्हा
ल्हा
व्हायला
नको
. अंधारातली
कट
कारस्थाने
बरबादी
पेरू
नयेत
म्हणजे
झाले
. "पोरे
खातील
प्वाटभर
मलिदा
" असे
भरला
डोळा
जगणे
भेटावे
म्हणून
माणसे
जगभर
उत्सव
करतात
.जत्रा
भरवतात
. विठू
रायाच्या
भेटीसाठी
वारीला
जातात
. अगदी
दगडधोंडे
पण
पूजतात
. शेतात
पीक
उभे
राहिले
की
नाच
गाणी
करतात
. वाजत
गाजत
धान्य
घरी
आणतात
. बहुतेक
उत्सव
पावसा
पाण्याची
गाणी
म्हणत
, सुगीचे
स्वागत
करत
येतात
. लोकजीवन
असा
इहलोकीचा
देव
भजत
राहते
. दुष्ट
जीवांच्या
संहाराची
नाटके
हेच
देशो
देशीच्या
लोक
रंगभूमीचे
स्वरूप
असते
. ही
लोकोत्सवी
रंग
भूमी
आपण
आवर्जून
पहायला
हवी
. ती
माणसांची
अंगे
रंगवते
. मुखवटे
देते
. पिशाच्च
होवून
मानवाना
पिशाच्चांच्या
अंगावर
जायला
सांगते
. कोंकण
प्रदेशातल्या
दशावतार
नाटकात
प्रथम
प्रवेश
करतो
तो
संकासुर
. लांब
रक्त
दाखवणारी
जीभ
बाहेर
काढणारा,
ब्रम्हदेवाचे
वेद
चोरून
नेणारा
.विष्णु
संकासुराचा
वध
करतो
. आणि
मगच
त्याला
जगाचा
सांभाळ
करणे
शक्य
होते
.
ता
३१
ऑक्टोबरला
अमेरिकेत
सगळीकडे
हलोवीन
(Halloween) उत्सव
नारिंगी
रंगाचे
भोपळे
पोखरुन
विक्राळ
चेहरा
दाखवत
येतोय
. हाडांचे खोटे
खोटे
सापळे
, भेसूर
कवट्या
, कभिन्न
रंगाचे
रोखून
बघणारे
मांजर
, रक्त
पिणारी
वाघळे
, प्रचंड
जाळे
विणून
बसलेले
कोळी
घराबाहेर
उभे
आहेत
. भूतघरे
उभी
रहात
आहेत
. तुम्ही
घरात
गेलात
की
कोणीतरी
तुमचा
खालून
पाय
ओढणार
. तुम्ही
घाबरणार
. मुखवटे
घालून
मुलाना
घेवून
माणसे
घरोघर
जातात
. दारात
उभे
राहून
विचारतात
. Trick or treat? काही
देणार
खायला
की
भीती
दाखवणार
? माणसे
मुलांना
चोक्लेट्स
देतात
. पैसेही
देतात
. लोकजीवनात
खोडसाळ
आणि
रासवटवृत्तीपण
असते
. काही
ठिकाणी
घरातून
एक
भुताचा
मुखवटा
भसकन
बाहेर
येतो
. मुले
धावू
लागतात
अथवा
कापू
लागतात
. याला
म्हणायचे
ट्रिक
. हलोविन
हा
निधर्मी
लोकोत्सव
आहे
. चर्चमध्ये
कोणी
जात
नाहीत
. चर्चमध्ये
असतो
यावेळी
"सकल
संतांचा
दिवस
" All Saints Day. हलोविन
उत्सव
स्वतः
पिशाच्च
होवून
भूते
गाडायला
जाणार
. प्रकाशाचे
दिवस
सरत
आलेत
. आता
अंधाराचे
दिवस
येणार
. दिवस
लहान
. रात्र
मोठी
होणार
. अंधारात
भुताखेतांचा
त्रास
फार
. म्हणून
हलोविन
हेलो
हेलो
करीत
घरोघर
धावते
. अमेरिकेतील
मराठी
माणसेही
अष्टा
गावच्या
भावया
बघायला
जावे
तसे
मुखवटे
बघायला
जातात
. आपल्या
दारातही
भूतजग
निर्माण
करतात
.
जगभर
माणूस
नावाचे
मन
एकाच
ऊर्मीचे
असते
. सांगली
जिल्ह्यातले
अष्टा
हे
गाव
"भावई
" नावाने
राक्षस
वधांचे
नाट्य
सडकेवर
उभे
करते
. गावात
जगदंबेचा
संचार
असतो
. सांगलीला
पूर्वी
तडकडताई
कशी
भयानक
मुखवटा
घालून
,हातात
सूप
घेऊन
रस्ताभर
धावायची
. "तडकडताई
भुताची
आई
-नाकात
कवडी
बाजार
दौडी
" म्हणत
माणसे
नाचत
राहायची
. तडकडताई
हातातल्या
सुपाने
ज्याला
त्याला
झोडपत
राहायची
. जणू
गावातली
अरिष्ते
हाकलत
न्यायची
. गावाबाहेर
महारवाड्यातल्या
मोठ्या
झाडाखाली
तडकडताईचे
लग्न
व्हायचे
. नवराही
लोकांच्या
पायात
बोरीचे
काटे
मोडत
यायचा
. तडकडताईला
आणखी
कुठल्या
गावाने
पसार
करू
नये
म्हणून
जोगन्या
नावाचे
दाढीवाले
चांदीची
वाटी
हातात
घ्यायचे
. दोन
तलवार
धारी
वाटी
रक्षण
करायचे
. आता
हे
सारे
काय
म्हणायचे
?
दक्षिण
कोकणात
तर
बघायलाच
नको
.सर्वत्र
वेताळाचा
संचार
. देसरूढ़
नावाची
एक
लोकजीवनातील
रूढी
येथे
मालवण
, वेंगुर्ला
, कुडाळ
, सावंतवाडी
भागात
आहे
. शिमग्यानंतर
एक
दिवस
गावच्या
प्रमुख
महाराने
सूर्योदयाबरोबर
ढोलाचा
ताल
धरायचा
. गावातली
जाणकार
मंडळी
घरोघर
जावून
अन्न
एकत्र
करणार
. दिवस
बुडला
की
नदीपार
जावून
खड्डा
काढणार
आणि
त्यात
अन्न
पुरणार
. म्हणजे
गावातली
सगळी
भुते
गाडली
गेली
. गाव
आता
निर्भय
! पण
हे
सारे
यथासांग
होईतो
महाराने
ढोल
थांबवायचा
नाही
. ढोल
थांबला
की
भुते
मोकाट
सुटणार
. एक
म्हातारा
महार
ढोल
वाजवता
वाजवता
काळजात
कळ
येऊन
खाली
पडला
. त्याचा
ढोल
मुलाने
सावरला
. काळजाचा
ठोका
थांबला, पण ढोलाचा
ठोका
चालू
राहिला
. "इडा
पिडा
टलो
. लेकरा
वासराना
उदंड
आयुष्य
मिळो
" हा
लोकांचा
टाहो
ऐकतच
`दुरिताचे
तिमिर
जावो
`ही
वाणी
आळंदीच्या
ओवीला
फुटली
असावी
.
पानवाला.
माणूस
नाटक
का
पाहतो
? या
प्रश्नाचे
उत्तर
`माणूस
आरशात
का
बघतो
?` या
प्रश्नाच्या
उत्तरात
असावे
. मी
येथे
` आहे
`असे
न
म्हणता
,`असावे
`असे
म्हणतो
. कारण
मला
नेहमी
प्रश्नच
उत्तरापेक्षा
जास्त
महत्वाचे
वाटतात
. माणसाला
आयुष्यात
चांगले
चांगले
प्रश्न
स्वतःला
विचारता
यायला
हवेत
. प्रश्न
कायमचे
असतात
. उत्तरे
तात्पुरती
राहतात
. तर
नाटक
हा
प्रकार
सगळ्या
जगण्याला
व्यापून
पुन्हा
रंगमंचावरही
नाना
प्रकारे
खेळ
करुन
दाखवतो
. पण
नाटक
म्हणजे
खोटे
खोटे
असणे
नव्हे
. ते
जगण्याला
शोधत
जाणे
असते
. माणूस
हाच
माणसासमोरचा
सर्वात
मोठ्या
उत्सुकतेचा
पण
अतिगहन
प्रश्न
आहे
आणि
म्हणुनच
मला
परत
परत
भरतमुनि
आठवतात
. भिन्न
अभिरुचीच्या
लोकांचे
एकमेव
`समाराधन
`म्हणजे
नाटक
. कारण
ते
त्रिगुण
विश्वामधुन
निर्माण
झालेल्या
लोकचरिताचे
नाना
रस
, नाना
रंग
, नाना
ढंग
उलगडून
दाखवते
. माणसाच्या
जगण्यात
सत्व
, रज
, तम
असे
भोगणे
आणि
भोग
कालवलेले
आहेत
. जीवनाचे
रंग
-ढंग
देवालाही
पुरते
आकलन
होत
नाहीत
. आणि
म्हणूनच
तो
अवतार
घेतो
. माणूस
म्हणून
जगण्यात
त्याचा
पार
अवतार
होऊन
जातो
.
मी
असा
एकदम
विवरात
गेलो
. कारण
जी
.ए
. कुलकर्णी
यानी
विवरात
नेलेल्या
एका
कथेबद्दल
`मला
काही
सांगायच
` आहे
. जी
. ए
. यांची
`स्वामी
` ही
कथा
वाचण्यापूर्वी
दव्याची
गोळी
घ्या
. छाती
दडपून
जाईल
. श्वास
कोंडेल
. एका
आडगावात
केवळ
आपले
मूळ
गाव
म्हणून
उतरलेला
तरुण
शेवटची
बस
चुकली
म्हणून
हताश
मुद्रेने
उभा
असतो
. प्रदेश
बिनचेहरा
असणारा
. एकही
माणूस
ओळख
दाखवायला
तयार
नाही
. काय
करावे
? कोठे
जावे
? कसे
रहावे
? एका
कफनीवाल्या
महंताचा
हात
खांद्यावर
पडतो
. तो
त्या
तरुणाला
काय
करावे
? कोठे
जावे
? कसे
रहावे
? कुठवर
राहावे
? या
प्रश्नांची
उत्तरे
पुरवायला
मठात
घेऊन
जातो
. आश्रम
जमिनीखाली
खोल
खोल
भुयारात
असतो
. कफनी
चढवून
तरुण
त्या
महंतामागे
जातो
. आत
जाणारा
कोणी
परत
मागे
येणार
नसतो
. तरुण
जीवालाच
स्वामी
बनून
आता
लालबुंद
प्रकाशात
शेवटच्या
श्वासापर्यंत
तेथे
रहायचे
असते
. मखमली
शय्या
, चांदीच्या
ताटातून
दोन्ही
वेळा
सुग्रास
भोजन
. गरम
पाणी
स्नानाला
. स्नानाच्या
वेळीच
केवळ
उभे
राहता
येणार
. एरवी
फक्त
रांगत
जाणे
. `उरग
` असा
जी
. ए
` यांचा
शब्द
आहे
. आधीच्या
तीन
स्वामींचे
आता
फक्त
लोंबणारे
हाडांचे
भेसूर
हास्य
बंद
कप्प्यात
असते
. ते
तरुण
स्वामीला
भेडसावत
राहते
. भक्कम
चिरे
कपारीतुनसुद्धा
बाहेर
आलेला
वेलीचा
नाजुक
कोंब
हवा
पुरवठा
करायच्या
नलिकेतून
वरच्या
जमिनीत
फुलावा
म्हणून
सारून
नवा
स्वामी
खाचीत
मखमली
शय्येवर
अगदी
निश्चल
होतो
. जीर्ण
कपडे
उतरून
आत्मा
नवी
वस्त्रे
धारण
करायला
निघतो.
ही
श्वास
कोंडलेली
जिवंत
समाधीची
कथा
१७
ऑक्टोबरला
अमेरिकेच्या
बे
एरियातील
कला
नावाच्या
संस्थेने
रंगमंचावर
आणली
. स्वामीना
आणि
महंतालासुद्धा
फ्रीमौंट
(Fremont) कम्युनिटी
सेंटरमध्ये
बाहेर
काढले
. जणू
एक
कबरच
फ्री
श्वास
घ्यायला
बाहेर
आली
. अमोल
लेले
यानी
महंत
उभा
केला
. रोहित
पोतनीस
यानी
स्वामींचा
कोंडलेला
श्वास
ऐकवला
. हेमांगी
वाडेकर
यानी
प्रभावी
संकलन
आणि
निवेदन
केले
. मनोज
वाडेकर
दिग्दर्शक
बनून
नुसत्या
स्वामीनाच
नव्हे
तर
मराठी
रंगभूमीच्या
पुढील
प्रवासाला
दिशा
सुचवत
राहिले
. प्रेक्षक
अवाक
, थकक
झाले
. जगण्याच्या
बुडाशी
आपण
गेलोत
असा
त्याना
तो
अनुभव
होता
.जी
. ए
. यांची
स्वामी
ही
कथा
फार
वर्षापूर्वी
मी
वाचली
होती
.चार
दिवस
दबल्या
छातीने
मग
मी
वावरलो
होतो
.जी
. ए
. नी
असे
हे
अजब
भूत
बोकांडी
का
बसवावे
? एवढी
भयकथा
त्याना
का
सुचावी
? ही
वेदना
का
म्हणून
? महंत
कोणताही
मठ
-पंथ
-अगदी
अघोरी
पंथसुद्धा
सांगत
नाही
. त्याला
अवतारी
पुरुषाची
कामना
नाही
.तपस्या
,उपासनामार्ग
, यांचे
भाकड
त्याला
रुचत
नाही
.मग
स्वामीनी
काय
करावे
? महंत
वाट
चुकलेल्याला
कोणत्या
वाटेला
लावतात
म्हणावे
?ही
कथा
नशा
देते
की
बधीरता
भरते
? गडकरी
कवीनी
पूर्वी
इश्काचा
जहरी
प्याला
दाखवून
,त्या
प्याल्याने
झाडाला
`टोकाविन
चालू
मरणे
ते
त्याचे
होते
जगणे
, असे
सांगितले
होते
.पण
झाड
इश्काच्या
जहरी
प्याल्यात
तरी
बुडाले
होते
. महन्ताच्या
आश्रमात
कुठला
इश्क
? येथे
फक्त
श्वास
कोंडणे
-- स्वामींचे
आणि
वाचकांचे
. मला
स्वामी
कथेचा
हेतुच
समजला
नव्हता
. अजूनही
उमगलाय
असे
वाटत
नाही
.
पण
`स्वामी
` रंगमंचावर
आल्यापासून
अनेक
खिडक्या
किलकिल्या
होताहेत
असे
वाटू
लागले
. `स्वामी
`कथा
स्टेजवर
उभी
करणे
हा
तद्दन
वेडेपणा
आहे
, असे
वाटत
असताना
आता
मात्र
माझे
मत
खूप
बदलले
आहे
. मी
प्रयोग
पाहिला
.शब्द
बाजूला
करून
कविता
वाचावी
तसे
शब्द
बाजूला
करुन
मी
कथा
पाहिली
. आणि
नाथांचे
भारुड
आठवू
लागले
. अध्यात्म
रंगमंचावर
येते
हे
समजले
. तर्क
फारसा
भरवशाचा
नसतो
.स्मृति
ग्रंथ
एक
काही
धड
सांगत
नाहीत
. दोन
मुनीना
प्रमाण
मानावे
तर
एकाचेही
सांगणे
फायनल
नसते
. शेवटी
धर्माचे
रहस्य
गुहेतच
हरवले
आहे
. बरी
माणसे
जगतात
तसे
आपणही
जगावे
झाले
. धर्मस्य
तत्त्वं
निहितं
गुहायाम
! हे
सांगणारा
कोणीतरी
मला
`स्वामी
` कथेत
कुठेतरी
दिसतोय
असे
वाटू
लागलय
. हे
केवळ
`गुहा
` या
शब्दाखातर
नाही
. लायब्नीज
नावाच्या
जर्मन
तत्त्व
चिन्तकाने
हे
सारे
विश्व
मोनाड
म्हणजे
चेतनायुक्त
अणु
यांची
वसाहत
आहे
असे
म्हटले
आहे
. प्रत्येक
मोनाड
स्वतन्त्र
व्यक्तिमत्वाचा
, अजिबात
खिडकी
नसलेला
. पण
त्याच्या
ठायी
अवघ्या
जगाचे
प्रतिबिम्ब
असते
. हा
बिन
खिडकीचा
मोनाड
पुन्हा
नीट
तपासावा
, असेही
वाटू
लागलय
. ही
प्रेरणा
मला
`स्वामी
` कथेच्या
नाट्य
प्रयोगातून
मिळतेआहे
. `जग
हे
बंदीशाला
`, `जो
तो
पथ
चुकलेला
` हे
गीत
मला
`स्वामी
` कथेचा
अर्थ
सांगेल
काय
असे
माझे
मनच
मला
विचारू
लागले
आहे
. मनुष्याने
चांगले
प्रश्न
शोधावेत
. त्यांच्या
नेमक्या
उत्तरासाठी
जीव
मुठीत
धरु
नये
. हे
चांगले
प्रश्न
नाट्यप्रयोगानी
उभे
करायचे
असतात
. उपदेश
, मुक्ति
, दास्यनिवारण
अशी
पखालवाल्याची
कामे
तेवढी
नाटकावर
लादू
नयेत
. भोगाचे
एक
भोग
म्हणून
साक्षात्
दर्शन
घडले
तर
`अजि
म्या
ब्रम्ह
पाहिले
`असे
का
मानू
नये
?
`स्वामी
`कथेच्या
नाट्यरूप
दर्शनाने
मराठीतल्या
अनेक
कथाना
रंगमंच
खुला
होणार
आहे
असे
मला
वाटते
. तंत्रे
सुचत
जातात
. कथावस्तुमध्ये
ती
असतात
. ती
निरखता
यायला
मात्र
हवीत
. जी
. ए
. यांच्या
इतर
कितीतरी
गूढ़
कथा
रंगमंचाची
वाट
बघतील
. दुर्बोध
ठरलेल्या
पण
मनावर
गारुड
आहे
अशा
मराठी
कवितांचे
सुद्धा
नाट्य
रूप
रंगमंचावर
दाखवता
येणार
नाही
का
? अनेक
कठीण
पण
ताकदवान
कथा
रंगमंचावर
उतरु
शकतील
. सांगलीचे
श्रीरंग
विष्णु
जोशी
यानी
`वीज
` नावाची
मुक्ता
बाईच्या
मुक्तीचा
क्षण
जिवंत
करणारी
कथा
नुकतीच
प्रसिद्ध
केली
आहे
. ही
`वीज
`रंगप्रेमी
कलाकारानी
जरूर
रंगमंचावर
पसरली
पाहिजे
. असे
कितीतरी
श्रीरंग
रंगभूमीला
नवीन
रंग
देण्याकरिता
आपले
कुंचले
पुरवतील
. जी
. ए
. यांच्या
`स्वामी
` कथेच्या
रंगभूमीवरील
अवतारा
मध्ये
मला
हे
सारे
नवे
नवे
अवतार
आज
खुणावत
आहेत
.
पानवाला
.